60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना  ₹30,000 मदत; राज्य सरकारचा मोठा निर्णय. Senior Citizen News 

Irfan Shaikh ✅
2 Min Read

60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना  ₹30,000 मदत; राज्य सरकारचा मोठा निर्णय. Senior Citizen News 

मुंबई : प्रतिनिधी.

Senior Citizen News : राज्यातील 60 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, सर्व धर्मांतील 60 वर्षांवरील पात्र ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थदर्शन यात्रेसाठी प्रति व्यक्ती कमाल ₹30,000 पर्यंत आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. आर्थिक अडचणींमुळे तीर्थयात्रा पूर्ण करू न शकलेल्या ज्येष्ठांसाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.

योजनेचा मुख्य उद्देश. Senior Citizen News :

राज्यातील अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने तसेच त्यांच्यासोबत प्रवासासाठी कोणी नसल्यामुळे त्यांचे तीर्थयात्रेचे स्वप्न अपूर्ण राहते. या पार्श्वभूमीवर त्यांना आर्थिक मदत करून त्यांच्या धार्मिक व आध्यात्मिक भावना पूर्ण करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात येत आहे.

हे ही वाचा 👇🏻  कर्मचार्‍यांसाठी मोठा निर्णय, जाणून घ्या संपूर्ण माहिती .old pension scheme 2025

हे ही वाचा…..

आठवा वेतन आयोग अधिकृतपणे स्थापन; 2027 पर्यंत अहवाल, लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा? 

आता ५ नव्हे तर एका वर्षात मिळणार ग्रॅच्युइटी ; कामगार कायद्यात महत्त्वाचे बदल.Gratuity Rule Change India

ईपीएफओचे नवे मोबाइल अ‍ॅप एप्रिलमध्ये लाँच; यूपीआयद्वारे थेट पीएफ काढता येणार. EPFO New App

योजनेची व्याप्ती

या योजनेत राज्यातील तसेच देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश असणार आहे. निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेसाठी पात्र व्यक्तीला एकदाच लाभ घेता येईल. प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती ₹30,000 इतकी निश्चित करण्यात आली आहे.

या खर्चामध्ये पुढील बाबींचा समावेश असेल:

  • प्रवास खर्च
  • निवास व्यवस्था
  • भोजन खर्च
  • इतर आवश्यक सेवा
हे ही वाचा 👇🏻  वैधानिक देणी थकल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर संकट. Employees Salary Update 

पात्रता निकष. Senior Citizen News :

या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी लागू असतील:

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
  • वय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे

सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो ज्येष्ठ नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे. आर्थिक अडचणींमुळे मागे पडलेल्या तीर्थयात्रेच्या इच्छेला आता नवी संधी मिळणार असून, ही योजना ज्येष्ठांसाठी भावनिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे.

Follow:
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *