Wed. Feb 11th, 2026

    रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! पुणे पासुन धावणार वंदे भारत एक्सप्रेस. Vande Bharat Express

    पुणे | प्रतिनिधी. दि 8 फेब्रुवारी 2026

    Vande Bharat Express :  महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे ते देशाची राजधानी दिल्ली दरम्यान थेट वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी आता थेट राज्यसभेत मांडण्यात आली असून, यामुळे राज्याला आणखी एक नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    पुणे–दिल्ली हा देशातील अत्यंत व्यस्त आणि महत्त्वाचा लोहमार्ग असून, आजपर्यंत या मार्गावर कोणतीही स्वतंत्र, वातानुकूलित आणि वेगवान प्रीमियम श्रेणीतील रेल्वे सेवा उपलब्ध नाही. याच पार्श्वभूमीवर पुणे–दिल्ली दरम्यान वंदे भारत स्लीपर, राजधानी एक्सप्रेस किंवा तेजससारखी आधुनिक आणि उच्चगती रेल्वे सेवा सुरू करण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे.

    हे ही वाचा 👇🏻  निवृत्तीनंतरही आयुष्य सेट, जाणून घ्या संपूर्ण माहिती. BCCI pension scheme

    राज्यसभेत थेट मागणी. Vande Bharat Express

    भाजप खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेच्या शून्यप्रहरात हा मुद्दा उपस्थित करत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पुणे–दिल्ली दरम्यान तातडीने प्रीमियम रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी केली. त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, पुणे–दिल्ली मार्गावर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असूनही आजपर्यंत या मार्गावर वंदे भारतसारखी आधुनिक सेवा उपलब्ध नाही.

    पुण्याचे राष्ट्रीय महत्त्व अधोरेखित

    डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले की, पुणे हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशातील एक महत्त्वाचे सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि आयटी केंद्र आहे. ‘पूर्वेचे ऑक्सफर्ड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात नामांकित विद्यापीठे, संशोधन संस्था, ऑटोमोबाईल, संरक्षण उद्योग आणि स्टार्टअप क्षेत्रातील अनेक मोठे प्रकल्प कार्यरत आहेत.

    हे ही वाचा 👇🏻  २०, २२ किंवा २४ कॅरेट सोन्याचा सध्याचा दर काय आहे? एका आठवड्यात सोने स्वस्त झाले आहे, तर चांदी महाग झाली आहे. Gold silver update

    पुण्यात लवकरच संरक्षण कॉरिडॉर साकार होत असून, केंद्र सरकारची अनेक कार्यालये, वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक आणि उद्योजक येथे वास्तव्यास आहेत. त्यामुळे पुणे–दिल्ली दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

    सध्या प्रवाशांना मोठ्या अडचणी

    सध्या पुणे–दिल्ली दरम्यान धावणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्यांना २० ते ३० तासांचा प्रवास लागतो. या गाड्या प्रचंड गर्दीने भरलेल्या असून सुविधा मर्यादित आहेत. यामुळे विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक, सरकारी अधिकारी आणि सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

    थेट प्रीमियम रेल्वे सेवा नसल्याने अनेक प्रवाशांना मुंबईमार्गे प्रवास करावा लागतो किंवा जुन्या आणि संथ गाड्यांवर अवलंबून राहावे लागते. परिणामी वेळेचा तसेच आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे.

    वंदे भारत सुरू झाल्यास मोठा फायदा. Vande Bharat Express

    पुणे–दिल्ली दरम्यान वंदे भारत स्लीपर किंवा तत्सम आधुनिक रेल्वे सुरू झाल्यास प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. प्रवाशांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, आरामदायी प्रवास आणि वेळेची बचत होईल. तसेच दिल्लीहून पुण्यात येणाऱ्या अधिकारी, व्यावसायिक आणि पर्यटकांसाठीही ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

    हे ही वाचा 👇🏻  तुमचा आयटीआर लवकर दाखल करा, अन्यथा तुम्हाला मोठा दंड भरावा लागेल.ITR Filing Last Date:

    पुणे हे वेगाने विकसित होणारे महानगर असून, दिल्लीशी थेट, जलद आणि आरामदायी रेल्वे सेवा ही काळाची गरज असल्याचे मत खासदारांनी व्यक्त केले आहे. आता या मागणीवर रेल्वे मंत्रालयाकडून कोणता निर्णय घेतला जातो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. Vande Bharat Express

    By Irfan Shaikh ✅

    नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *