राज्यातील या विभागाचा मोठा निर्णय! बदल्यांचे सुधारित धोरण जाहीर – जाणून घ्या संपूर्ण माहिती. Maharashtra transfer policy 2026
Maharashtra transfer policy 2026 : महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत दि. 15 एप्रिल 2026 रोजी बदल्यांचे सुधारित धोरण निश्चित करण्याबाबत महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे बदल्यांची प्रक्रिया अधिक पारदर्शक, नियमबद्ध आणि मर्यादित करण्यात येणार आहे.
📌 बदल्यांचे वर्ष निश्चित
नवीन धोरणानुसार बदल्यांचे वर्ष 31 मे पर्यंत निश्चित करण्यात आले आहे.
याचा अर्थ असा की, 31 मेपर्यंत पूर्ण झालेली सलग सेवा (Continuous Service) बदल्यांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
🔢 30% मर्यादा – एकाच वेळी मोठ्या प्रमाणात बदली नाही. Maharashtra transfer policy 2026
महत्वाचा बदल म्हणजे,
एका वर्षात एकाच वेळी एकूण कर्मचाऱ्यांच्या 30% पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची बदली केली जाणार नाही.
यामुळे अचानक मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बदल्यांवर नियंत्रण येणार आहे.
📅 विनंती बदल्यांचे वेळापत्रक
- सप्टेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांमध्येच विनंती बदल्यांचे आदेश काढले जातील
- वर्षभरात फक्त दोन वेळाच विनंती बदल्यांचे प्रस्ताव विचारात घेतले जातील
⚠️ विनंती बदल्यांवर कठोर नियम
- विनंती बदल्यांसाठी कोणताही भत्ता (Allowance) मिळणार नाही
- पदग्रहण अवधी (Joining Time) देखील मिळणार नाही
- रिक्त पद उपलब्ध नसताना बदली केल्यास ती अनियमित (Irregular) मानली जाईल
- अशा अनियमिततेसाठी संबंधित कार्यालय प्रमुखाला जबाबदार धरले जाईल
📝 कोणत्या कारणांसाठी मिळेल विनंती बदली? Maharashtra transfer policy 2026
फक्त खालील विशेष परिस्थितीतच विनंती बदल्यांचा विचार केला जाणार आहे:
- पक्षाघाताने आजारी कर्मचारी / कुटुंबातील अवलंबून सदस्य
- अपंग कर्मचारी / मतिमंद मुलांचे पालक
- हृदय शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी / कुटुंबातील सदस्य
- जन्मतः एकच मूत्रपिंड / किडनी ट्रान्सप्लांट / डायलिसीस रुग्ण
- कॅन्सरग्रस्त कर्मचारी / कुटुंबातील सदस्य
- आजी / माजी सैनिक / अर्धसैनिक जवानांच्या पत्नी / विधवा
- विधवा कर्मचारी
- कुमारिका कर्मचारी
- परित्यक्ता / घटस्फोटित महिला कर्मचारी
- वयाची 53 वर्षे पूर्ण केलेले कर्मचारी
- पती-पत्नी एकत्रिकरण (Spouse Posting)
- इयत्ता 10 वी / 12 वी मध्ये शिकणारी मुले असलेले कर्मचारी
🤝 समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रिया
नवीन धोरणानुसार बदल्या समुपदेशन (Counselling) प्रक्रियेच्या माध्यमातून केल्या जाणार आहेत.
यामुळे पारदर्शकता वाढून कर्मचाऱ्यांना योग्य ठिकाणी बदली मिळण्याची शक्यता वाढेल.
या सुधारित धोरणामुळे बदल्यांमध्ये शिस्त, पारदर्शकता आणि न्याय्यता येण्याची अपेक्षा आहे. विशेषतः विनंती बदल्यांवर नियंत्रण आल्याने गैरप्रकारांना आळा बसेल आणि खरोखर गरज असलेल्या कर्मचाऱ्यांनाच प्राधान्य मिळेल. Maharashtra transfer policy 2026
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .




