पेन्शनबाबत १५ दिवसांत अधिसूचना निघणार , सरकारचे मोठे आश्वासन. मोठी बातमी! १८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे. Government Employees Strike Maharashtra

मुंबई :  Government Employees Strike Maharashtra : राज्यभरातील तब्बल १८ लाख सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप अखेर चौथ्या दिवशी मागे घेण्यात आला आहे. सरकारकडून सुधारित निवृत्ती वेतन योजनेसह प्रलंबित १८ मागण्यांवर सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर कर्मचारी संघटनांनी हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला.

सरकारी निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने दिलेल्या माहितीनुसार, सुधारित निवृत्ती वेतन योजनेबाबत पुढील १५ दिवसांत अधिसूचना काढली जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. याशिवाय निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याबाबतही निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. Government Employees Strike Maharashtra

हे ही वाचा 👇🏻  या नियमांमध्ये बदल, जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्या साठी महत्वाची बातमी. Central Employees cghs update

👉🏻 संपुर्ण परिपत्रक वाचा क्लिक करून 

गेल्या चार दिवसांपासून राज्यभर खळबळ उडवणारा हा संप अखेर मुख्य सचिव आणि कर्मचारी संघटनांमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर स्थगित करण्यात आला. बैठकीत अनेक मागण्यांवर सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे.

संपामुळे अनेक शासकीय कामकाजांवर परिणाम झाला होता. मात्र आता शनिवारपासून आरोग्य विभागातील सेवा पुन्हा सुरू होणार असून सोमवारपासून सर्व शासकीय कार्यालये नियमितपणे सुरू होतील, अशी माहिती कर्मचारी संघटनांकडून देण्यात आली आहे. Government Employees Strike Maharashtra

या संपातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पेन्शन योजना होता. सरकारने यासंदर्भात १५ दिवसांच्या आत अधिसूचना काढण्याचे आश्वासन दिल्यानेच संप मागे घेण्याचा निर्णय झाला, अशी चर्चा शासकीय वर्तुळात रंगली आहे.

हे ही वाचा 👇🏻  पेन्शन मध्ये वाढ, पेन्शन धारक आनंदी, जाणून घ्या संपूर्ण माहिती, pension increase August

कर्मचारी संघटनांनी सरकारच्या आश्वासनांवर विश्वास व्यक्त करत सध्या आंदोलन स्थगित केले असले तरी, दिलेल्या मुदतीत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. Government Employees Strike Maharashtra

Leave a Comment