केंद्र सरकारकडून नागरिकांना महत्वाचा संदेश – लाचखोरीविरोधात दिला कडक इशारा!. Central Government message

केंद्र सरकारकडून नागरिकांना महत्वाचा संदेश – लाचखोरीविरोधात दिला कडक इशारा!. Central Government message

Central Government message :   नमस्कार मित्रानो अलीकडेच सोशल मीडियावर सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविषयी अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. या घटनेमुळे सरकारी यंत्रणेविषयी लोकांचा विश्वास कमी होऊ नये, यासाठी केंद्र सरकारकडून नागरिकांना थेट मोबाईल संदेशाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.

सरकारने पाठवलेल्या या SMS संदेशांद्वारे नागरिकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की —
“लाच देऊ नका, आणि लाच मागितल्यास तक्रार करा!”

हे ही वाचा 👇🏻  आठव्या वेतन आयोगाबाबत आनंदाची बातमी, या कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत बदल होणार. 8th pay feb news

सरकारचा जनजागृती संदेश. Central Government message

केंद्र सरकारने नागरिकांच्या मोबाईलवर पाठवलेल्या या संदेशात नमूद केले आहे की,
केंद्र सरकारचे अधिकारी किंवा कर्मचारी जर खालील कोणत्याही विभागांमध्ये कार्यरत असतील आणि लाच मागत असतील, तर त्यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी सीबीआय (केंद्रीय अन्वेषण ब्युरो) पुणे यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा.

या विभागांमध्ये समावेश आहे: Central Government message

  1. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम.
  2. राष्ट्रीयकृत बँका.
  3. सी.जी.एस.टी (केंद्रीय वस्तू व सेवा कर विभाग).
  4. कस्टम्स विभाग.
  5. केंद्रीय शिक्षण संस्था.
  6. भारतीय डाक विभाग.
  7. भारतीय रेल्वे विभाग.
  8. बी.एस.एन.एल. इत्यादी

तक्रारीसाठी हेल्पलाइन क्रमांक Central Government message

जर कोणत्याही सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून लाच मागितली जात असेल, तर नागरिकांनी खालील हेल्पलाइन क्रमांकावर थेट संपर्क साधावा —
📞 सीबीआय पुणे हेल्पलाइन: 9175022250

हे ही वाचा 👇🏻  देशातील कर्मचाऱ्यांना २०२६ मध्ये सरासरी ९.१% वेतनवाढीची शक्यता; ‘एऑन’च्या अहवालात अंदाज. India salary hike 2026

सरकारचा उद्देश

या मोहिमेमागील मुख्य हेतू म्हणजे नागरिकांचा सरकारी यंत्रणांवरील विश्वास टिकवून ठेवणे आणि प्रशासनामध्ये पारदर्शकता वाढविणे.
सरकारने स्पष्ट केले आहे की, लाचखोरी ही गंभीर गुन्हा असून अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाई केली जाईल.

नागरिकांनी कोणत्याही दबावाला न जुमानता, अशा प्रकारच्या घटना घडल्यास तक्रार नोंदवून प्रामाणिक प्रशासनाला सहकार्य करावे, असे केंद्र सरकारने आवाहन केले आहे.

📰 स्रोत: केंद्र सरकारचा जनजागृती संदेश / सीबीआय पुणे हेल्पलाइन अभियान

Leave a Comment